Ad will apear here
Next
अनाथ, वंचितांच्या विकासासाठी झटणारे हरी ओम बालगृह
अहमदनगर जिल्ह्यातील हरी ओम बालगृह ही संस्था अनाथ, वंचितांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आणि केवळ लोकसहभाग व इच्छाशक्ती यांच्या जोरावर ही संस्था अडथळ्यांवर मात करत आपले कार्य नेटाने करते आहे. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज जाणून घेऊ या टाकळी खंडेश्वरी या गावातील हरी ओम बालगृह या संस्थेविषयी.....
........
बाबूराव रामभाऊ गिरी ऊर्फ गिरी महाराज यांनी २००८मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी खंडेश्वरी या छोट्याशा गावात ‘हरी ओम बालगृहा’ची स्थापना केली. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी व मागास तालुक्यांतील धनगर, फासेपारधी, भिल्ल, भटके, वंचित घटकांतील, तसेच, अनाथ मुलांना एकत्र आणून त्यांना शिक्षण व संस्कार देणारी निवासी संस्था असे हरी ओम बालगृहाचे स्वरूप होते. गिरी महाराजांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या पैशातून बालगृहासाठी इमारत बांधली. नंतर मुलांच्या पालनपोषणासाठी पैसे कमी पडू लागले म्हणून त्यांनी शेती विकली व प्रसंगी कर्ज काढून आणि भिक्षा मागूनदेखील मुलांच्या गरजा पूर्ण केल्या.
 
२०१३मध्ये काही सरकारी हस्तक्षेपामुळे संस्थेची मान्यता रद्द झाली. त्या वेळी गिरी महाराजांनी फारुक बेग यांच्याकडे संस्थेची धुरा सोपविली. फारुक बेग यांनी संस्था पुन्हा उभी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. गावातीलच एक सद्गृहस्थ अनिल वडवकर यांनी संस्थेसाठी एक एकर जागा दिली. बेग यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाजानेदेखील मदतीचा हात दिल्याने संस्थेने पुन्हा नव्याने सुरुवात केली.  

‘हरी ओम बालगृह’ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते. शालेय अभ्यासक्रमाशिवाय मुलांमधील कलागुण ओळखून, त्यांचा विकास करण्याला इथे प्राधान्य दिले जाते. गेल्या वर्षी मुलांना गणेशमूर्ती तयार करण्याचे व रंगवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या वर्षी मुलांनी तीनशे गणेशमूर्ती बनविल्या. त्यांची आसपासच्या गावात विक्री करून मिळालेल्या पैशांतून संस्थेसाठी निधी जमा करण्यात आला. संस्थेने भरविलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून तयार झालेली मुले राज्यभरात आपले व्याख्यानाचे कार्यक्रम करतात. संस्था त्यांना तशी संधी देते. संस्थेतील विद्यार्थिनी शिवगीता शेळके हिने कर्जत व नेवासा तालुक्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘स्त्री भ्रूणहत्या’ या विषयावर व्याख्यान दिले आहे. संस्थेतील मुलांच्या फक्त शालेय शिक्षणाचीच जबाबदारी घेतली जाते असे नाही, तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठीसुद्धा संस्था मदत करते. गेल्या तीन-चार वर्षांपासून श्रीगोंद्यातील एका विद्यार्थिनीला सनदी लेखापाल (सीए) होण्यासाठी लागणारे शिक्षण घेण्यास संस्था आर्थिक मदत करत आहे. 

संस्था मुलांबरोबरच गावातील इतर नागरिकांसाठीदेखील काम करते. नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘सर्व रोग निदान शिबिर’ आयोजित करण्यात येते. स्थानिक डॉक्टर शिबिरात सहभागी होतात. या शिबिरात विविध आजारांसाठीची तपासणी करून मोफत औषधोपचारही केले जातात. 

महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीची मदत मिळाल्यास त्यांचा जीव वाचवणे शक्य होते. हे लक्षात घेऊन अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करण्याचे कामही संस्थेचे कार्यकर्ते करतात. अपघातग्रस्तांपर्यंत लवकरात लवकर पोहोचता यावे म्हणून स्वतःची रुग्णवाहिका घेण्याचे संस्थेचे नियोजन आहे. 
भविष्यात मुलांबरोबरच महिला, युवक, वृद्ध व प्रौढ मतिमंदांसाठी काम करण्याची संस्थेची योजना आहे. या योजना सफल होण्यासाठी संस्थेला मदतीची आवश्यकता आहे. समाजासाठी अत्यंत चांगले काम करणाऱ्या या संस्थेच्या कार्याला शुभेच्छा!

संपर्क : फारुक बेग, हरी ओम बालगृह, मु. पो. टाकळी खंडेश्वरी, ता. कर्जत, जि. अहमदनगर
मोबाइल : ९४२३७ ८८४६५

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZWHBI
Similar Posts
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
कृषी विज्ञान केंद्रात महिला दिन सोलापूर : राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्र आणि येथील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांनी भूषवले
विषमुक्त शेतीचे बीज रोवणाऱ्या ‘बीजमाते’चा पद्मश्रीने गौरव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावात राहणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे या माऊलीचे नाव आता देशभर झाले आहे. कारण त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमारे १५० प्रकारच्या गावरान आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या पिकांच्या जातींच्या बियाण्याचे जतन त्यांनी केले आहे. विषमुक्त शेतीचा प्रसार
अवनखेड ग्रामपंचायतीला दहा लाखांचा पुरस्कार जाहीर नाशिक : नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विभागस्तरावर प्रथम क्रमांकाचे दहा लाखांचे बक्षीस दिंडोरी तालुक्यातील (जि. नाशिक) अवनखेड ग्रामपंचायतीला जाहीर झाले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language